मुलें त्यांच्या आई-बापाना जे पैसे देत होते ते पैसे परुशी लोकांनी त्यांच्याकडून "देवाला अर्पण" म्हणून घेतले आणि अशा प्रकारे त्यांनी त्यांना त्यांच्या आई-बापांना साहाय्य करण्यास प्रतिबंधित केले [१५:३-६].
यशयाने अशी भविष्यवाणी केली की परुशी लोक त्यांच्या ओठांनी देवाचा सन्मान करतील परंतु त्यांचे अंत:करण देवापासून दूर असेल [१५:७-८].
परूशी लोक शास्त्र म्हणून मनुष्याचे नियम शिकवित होते [१:९].
येशूने म्हटले की मनुष्य जे कांही खातो ते त्याला विटाळवीत नाही [१५:११, १७, २०].
मनुष्याच्या तोंडातून जे कांही बाहेर पडते ते त्याला विटाळविते असे येशूने म्हटले [१५:११, १८, २०].
येशूने परूश्यांना आंधळे वाटाडी असे नाव दिले, आणि ते खड्ड्यांत पडतील असे सांगितले [१५:१४].
हृदयातून दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्म, चो-या, खोट्या साक्षी आणि शिव्या गाळी निघतात [१५:१९].
येशूने एका शब्दानेहि तिला उत्तर दिले नाही [१५:२३].
येशूने हे स्पष्ट करून सांगितले की त्याला फक्त इस्राएलाच्या हरवलेल्या मेंढरांकडेच पाठविण्यांत आले होते [१५:२४].
येशूने म्हटले की त्या बाईचा विश्वास फार मोठा होता, आणि त्याने तिची इच्छा पूर्ण केली [१५:२८].
येशूने मुके, व्यंग, लंगडे आणि आंधळ्यांना बरे केले [१५:३०-३१].
शिष्यांजवळ सात भाकरी आणि कांही लहान मासे होते [१५:३४].
येशूने भाकरी व मासे घेऊन उपकारस्तुति केली, त्या भाकरी मोडल्या आणि त्याने त्या त्याच्या शिष्यांना दिली [१५:३६].
चार हजार पुरूष शिवाय कांही स्त्रियां आणि मुलें ह्यांनी भाकरी खाल्ल्या आणि ते तृप्त झाले [१५:३८].
सगळ्यांनी खाऊन झाल्यानंतर सात टोपल्या भोजन उरले होते [१५:३७].